तुमचा राशीभविश्यावर विश्वास आहे का? माझा तरी नाही, जुन्याकाळात सांगितलेले भविष्य खरे ठरायचे कारण तेव्हाचे लोक तेवढा खोल अभ्यास करायचे, त्यांना खरच तेवढे ज्ञान होते.पण आजकाल सगळेजण भविष्य संगाण्य्साठी जन्मदिवस आणि वेळ विचारतात आणि एका पुस्तकात बघून भविष्य सांगतात. आता मला तुम्हीच सांगा, एक दिवसात एकच वेळी जगात किती जण जन्माला येत असतील? किंवा एका राशीत कितीजण मोडत असतील. म्हणून त्या सगळ्यांचे नशीब किवा भविष्य काय एकच असेल काय?
आजकाल तर चक्क लग्न जमवण्यासाठी पत्रिका पाहायचे खूळ डोक्यातआहे भरपूर लोकांचा,आणि अजून पण त्यावर विश्वास ठेवतात कसे हे मोठे नवलआहे. तसे हे खूळ बरच जुने आहे आणि ते परंपरेनुसार आत्ता पण बघतात. पण परत तोच प्रश्न, पत्रिका जुळवतात हि पुस्तके बघून, आणि एकच पुस्तकातून ४ जण गुण जुळवतात म्हणून गुण जरी सारखे निघाले तरी भविष्य सांगताना मात्र ४जण वेगवेगळे सांगतात,हे कसे शक्यआहे हे अजून मला कळले नाही. तुम्हाला काळे असेल तर मला नक्की सांगा. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून विचारले. पण शेवटी एकाचे पण खरे होत नाही. एवढे कळूनपण आमचा कडे रोज पेपर वाचतात ते भविष्य बघण्यासाठी.
आज काल सगळ्यांनी भविष्य बघणे हा एक व्यवसाय बनवलाआहे, भविष्य सांगून पैसे घेतात खरे पण खरं काहीच होत नाही, माझा घराजवळ १ भडजी राहतो, त्याने भविष्य सांगून एवढा पैसा कमावलाआहे कि त्याने मुंबई मध्ये नवीन घर घेतले.ते पण२ बेडरूमचे, आज मुंबई मध्ये घर घेणे ते पण२ बेडरूमचे किती महाग आहे हे मी तुम्हाला सांगायला नकोच. यापेक्षा अजून चांगले उदाहरण काय असेल? हे झाले पैसे कमवणे,आणि त्यांचा कडे माझी मैत्रीण दर ६ महिन्यांनी फेऱ्या मारते, तो तिला सांगतो कि पुढचा ६ महिन्यात तुझे लग्न होईल, असे ४ वर्ष निघून गेली पण अजून तिचे लग्न झालेच नाही. आणि लग्न होत नाही म्हणून तिच्या कढून दरवर्षी ३-४ हजाराची पूजा करून घेतो, तरीपण ती कशी विश्वास ठेवते हेच नवल,ते पण या युगात.आणि लग्न जमन्यासाठी, सुखी राहण्यासाठी भडजीची गरज कशालाआहे हेच मला कळत नाही. तुम्हाला कळत असेल तर मला नक्की कळवा .
तुमचे विचार खूप आवडले.तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार.”हे सगळ्यांणा कळवावे